या 3 खेळाडूंचे क्रिकेट करिअर बरबाद करताहेत गंभीर-आगरकर, चांगली कामगिरी करूनही देत नाहीये भारतीय संघात संधी..!

 Team India :  भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून गौतम गंभीर (Gautam Gambhir) महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहेत, ज्यांना भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी पाठिंबा दिला आहे. एकत्रितपणे, ही जोडी भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलत आहे.

"वर्ल्डकप संघातील त्यांची जागा धोक्यात नाही, मात्र..", विराट-रोहितच्या वर्ल्डकप खेळण्यावर स्पष्टच बोलले अजित आगरकर..!

गंभीर-आगरकर करताहेत चांगल्या खेळाडूंचे करिअर बरबाद?

मात्र दुसरीकडे हीच जोडी काही चांगल्या खेळाडूंचे करिअर संपवण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे. सध्या  गंभीर आणि आगरकरवर काही स्टार खेळाडूंचे करिअर उद्ध्वस्त केल्याचा आरोप देखील केला जात आहे. असे 3 खेळाडू आहेत ज्यांनी देशांतर्गत स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करून सारख टीम इंडियाचे दरवाजे ठोठावून सुद्धा ही जोडी त्यांना संधी देत नाहीये.

या उलट ज्या खेळाडूंनी त्यांच्या पेक्षा अर्धीही कामगिरी केली नाही अश्या खेळाडूंना टीम इंडियात संधी मिळतेय. हे पाहून नक्कीच भेदभाव होतंय अस दिसतंय. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते खेळाडू ज्यांच्यासोबत टीम इंडियाचे निवड समिती अध्यक्ष आणि मुख्य कोच भेदभाव करताहेत.

या 3 खेळाडूंचे क्रिकेट करिअर बरबाद करताहेत गंभीर-आगरकर

या 3 खेळाडूंचे क्रिकेट करिअर बरबाद करताहेत गंभीर-आगरकर, चांगली कामगिरी करूनही देत नाहीये भारतीय संघात संधी..!

१. सरफराज खान (Sarfraz Khan)

मधल्या फळीचा फलंदाज  सरफराज खान (Sarfraz Khan)ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संघाचा भाग होता, परंतु त्यानंतर त्याला एकही सामना न खेळता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून वगळण्यात आले. वगळल्यानंतर, सरफराज खानने इंडिया अ संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली. तरीही, त्याला संघात परतण्याची संधी नाकारण्यात आली.

सरफराजला दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध इंडिया अ संघातही स्थान देण्यात आले नाही. सर्फराज खानच्या बिघडत्या कारकिर्दीसाठी चाहते गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांनाही जबाबदार धरतात. त्यापेक्षा सरस कामगिरी न करता काही खेळाडूंना ते टीम इंडिया संधी देत आहेत. ज्यामुळे सरफराज चे करिअर खराब होतंय.

या 3 खेळाडूंचे क्रिकेट करिअर बरबाद करताहेत गंभीर-आगरकर, चांगली कामगिरी करूनही देत नाहीये भारतीय संघात संधी..!

२. ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad)

या यादीमध्ये दुसरा खेळाडू आहे तो म्हणजे चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad).  ऋतुराज सध्या तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. महाराष्ट्रासाठी त्याच्या प्रभावी कामगिरीव्यतिरिक्त, त्याने इंडिया अ संघासाठी देखील अपवादात्मक कामगिरी केली आहे.

गायकवाडला त्याच्या गेल्या चार सामन्यांमध्ये सामनावीर म्हणून गौरवण्यात आले आहे. यामुळे या खेळाडूबद्दल बरीच चर्चा सुरू झाली आहे. गायकवाडचा टी-२० मध्ये चांगला रेकॉर्ड आहे, तरीही तो अजूनही संघात परतू शकला नाही. चाहत्यांचा असा विश्वास आहे की, गौतम गंभीर आणि अजित आगरकर जोडी यामागे आहे.

३. संजू सॅमसन (sanju Samon)

टीम इंडियाचा यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसन सध्या टी-२० संघाचा भाग आहे, परंतु त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे. शुभमन गिलच्या संघात प्रवेशामुळे, सुरुवातीला सॅमसनला त्याच्या सलामीच्या स्थानावरून काढून टाकण्यात आले. त्याला मधल्या फळीत खेळवण्यात आले, जिथे काही सामन्यांमध्ये अपयश आल्यानंतर त्याला वगळण्यात आले.

Sanju Samson Profile - Cricket Player | Stats, Records, Video

सॅमसनने टी-२० स्वरूपात सलामीचा फलंदाज म्हणून अपवादात्मक कामगिरी केली आहे. एकदिवसीय स्वरूपात त्याच्या प्रभावी कामगिरी असूनही, सॅमसन टीम इंडियासाठी खेळू शकला नाही. चाहते यासाठी गौतम गंभीर आणि अजित आगरकरला दोष देतात.

संजूला सध्या या जोडीने फक्त बदली कामगार म्हणून संघाचा भाग बनवले आहे. जेव्हा रिषभ किंवा इतर खेळाडू जखमी होऊन बाहेर जातो तेव्हाच त्याला टीम इंडियात बदली म्हणून संधी दिली जाते. त्यानंतर त्याने कितीही चांगली कामगिरी केली तरीही त्याला संघातून बाहेर केले जाते. यामागे संघातील अंतर्गत राजकारण आहे, हे नक्की.!


हेही वाचा:

IPL 2026 :संजू की ऋतुराज कोण असणार CSK चा कर्णधार? अखेर चेन्नईच्या मालकाने केली अधिकृत घोषणा..!

WTC CYCLE: अखेर आयसीसीने घेतला मोठा निर्णय, WTC मध्ये आता 9 नाही तर सगळेच संघ उतरणार, दुहेरी डिव्हीजन रद्द..!

Leave a Comment

error: