Asia Cup 2025 IND vs PAK: आशिया कप २०२५ चे काउंटडाउन सुरू झाले आहे. ही स्पर्धा ९ सप्टेंबर रोजी युएईमध्ये सुरू होणार आहे. मात्र भारतात सर्वांना १४ सप्टेंबरच्या तारखेची आतुरतेने वाट पाहावी लागत आहे. या तारखेला भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील मोठा सामना होणार आहे.
या वेळेस पाकिस्तानने निवडलेल्या संघात 5 असे खेळाडू आहेत जे भारतीय संघावर भारी पडू शकतात. त्यांच्यात एकहाती सामना फिरवण्याची ताकत आहे. त्यामुळे या 5 खेळाडूंपासून भारतीय संघाला सावध राहावे लागणार आहे. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते खेळाडू..

Asia Cup 2025 IND vs PAK: या 5 पाकिस्तानी खेळाडूंपासून भारतीय संघाला धोका.
सलामीवीर सॅम अयुब टीम इंडियाच्या गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकतो. गेल्या एका वर्षात खेळल्या गेलेल्या १३ सामन्यांमध्ये अयुबने एकूण ३९६ धावा केल्या आहेत. पाकिस्तानचा नवा टी-२० कर्णधार सलमान आगा देखील भारतीय संघासाठी मोठा धोका बनू शकतो.
अब्बास आफ्रिदी देखील उत्तम फॉर्ममध्ये आहे आणि तो त्याच्या स्विंगिंग बॉलने फलंदाजांना चांगलेच अडकवू शकतो.. भारतीय फलंदाजांनाही हॅरिस रौफपासून सावध राहावे लागेल.. तो त्याच्या धारदार गोलंदाजीने भारतीय फलंदाजांना नक्कीच अडचणीमध्ये आणू शकतो..

-
सॅम अयुब
-
सलमान आगा
-
अब्बास आफ्रिदी
-
हॅरिस रौफ
हेही वाचा:
- Team India Next ODI Captain: रोहित नंतर गिल नाही तर ‘हा’ खेळाडू होईल भारतीय एकदिवशीय संघाचा कर्णधार, दिगाज खेळाडूचे मोठे वक्तव्य..!
- Sarfraz khan Century: सरफराज खानने ठोकले पुन्हा शतक, टीम इंडियाच्या निवड समितीला चोख उत्तर…!
- चेतेश्वर पुजारा ने अचानक का घेतली निवृत्ती? स्वतः केला मोठा खुलासा
1 thought on “Asia Cup 2025 IND vs PAK: पाकिस्तानचे हे 5 खेळाडू ठरू शकतात भारताला धोका, एकहाती जिंकू शकतात सामना..!”