3 कारणे ज्यामुळे रोहित शर्माच्या अनुपस्थितीत विराट नाय तर, बुमराह भारतीय संघाचा कर्णधार बनलाय…

3 कारणे ज्यामुळे रोहित शर्माच्या अनुपस्थितीत विराट नाय तर, बुमराह भारतीय संघाचा कर्णधार बनलाय…


आजपासून इंग्लंड मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यानचा चोथा कसोटी सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा कोरोनाच्या विळख्यात सापडल्यामुळे तो या सामन्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे साहजिक भारतीय संघाच नेतुत्व पुन्हा विराट करतांना दिसेल असचं वाटत होत. पण  झालं उलटेच.

बीसीसीआयने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची संघाच्या कर्णधार पदी नियुक्ती करत सर्वांना चकित केले. जसप्रीत बुमराहला टीम इंडियाचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. बीसीसीआयने गुरुवारी ही घोषणा केली. नियमित कर्णधार रोहित शर्मा कोरोनामुळे या सामन्यातून बाहेर पडला आहे.

कपिल देव यांच्यानंतर भारताचा कर्णधार झालेला बुमराह हा पहिला वेगवान गोलंदाज आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी उद्यापासून एजबॅस्टन येथे सुरू होत आहे. या मालिकेत टीम इंडिया २-१ ने पुढे आहे. अशा परिस्थितीत बुमराहला कर्णधार म्हणून मालिकेत संघाला विजयापर्यंत नेणे आवडेल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.

बीसीसीआयकडून सांगण्यात आले की रोहित शर्माची गुरुवारी सकाळी चाचणी करण्यात आली आणि तो पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. अशा स्थितीत तो या सामन्यातून बाहेर पडले आहेत. अशा परिस्थितीत निवड समितीने बुमराहला कर्णधार तर ऋषभ पंतला उपकर्णधार बनवले आहे. पंतने गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. अलीकडेच त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतही संघाची कमान मिळाली होती.

बुमराह

जसप्रीत बूमराहला कर्णधार बनवण्यामागची ही 3 महत्वाची कारणे.

१) वेगवान गोलंदाज म्हणून सर्वांत कुशल गोलंदाज.

भारतीय संघामध्ये कर्णधार व्हावं असा कोणता गोलंदाज असेल तर सध्या फक्त जसप्रीतचं नाव समोर येईल. त्यामुळेच त्याला या गोष्टीचा फायदा झाला. शिवाय आकडे पाहता तो एक उत्कृष्ट गोलंदाज तर आहेच परंतु तो  गोलंदाजीची कमान सुद्धा सांभाळू शकतो हे सिद्ध होतंय.

२) विराट कोहली पुन्हा कर्णधार होण्यास तयार नाही.

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने सर्वच फोर्मेटमध्ये कर्णधार पद सोडून दिलंय. त्यामुळे तो पुढे कधीही संघाची कमान सांभाळणार नाही हे त्याने याआधीच स्पष्ट केलं आहे. म्हणूनच बिसिसीआयने  रोहित नसल्यामुळे विराटकडे कर्णधारपद न देता बूमराहला कर्णधार बनवलंय.

३) कर्णधार म्हणून रिषभ पंतची कमजोरी..

बूमराहच्या अगोदर कर्णधार पदाचा पर्याय म्हणून रिषभ पंतकडे पहिले जात होते. परंतु मागच्या काही सामन्यात रिषभ पंतची कामगिरी पाहता तो कर्णधार म्हणून संघामध्ये समतोल राखण्यात आणी आपली कामगिरी सुधारण्यात दोन्हीतही अपयशी ठरलाय. म्हणूनच संघाने बूमराहच्या रूपाने आणखी एक पर्याय शोधून त्याची चाचणी सुरु केली आहे. येणाऱ्या काळात जर बुम राहने आपली कामगिरी सांभाळत कर्णधारपद योग्यरीत्या हाताळलं तर, रिषभ पंतचं कर्णधारपद नक्कीच  धोक्यात येईल.

आता जसप्रीतच्या नेतृत्वात भारतीय संघ कशी कामगिरी करतो, यावर सर्वांचे लक्ष लागलं आहे. हा कसोटी सामना आजपासून खेळला जाणार आहे..

असा असेल कसोटी संघ : जसप्रीत बुमराह (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, केएस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश कृष्ण यादव, प्रशांत यादव. आणि मयंक अग्रवाल.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा:

किस्सा 2013 गाडीचा: याचं गाडीमुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब दाऊद गॅंगच्या तावडीतून वाचले होते.

कोरोनातून बरे होताच राज्यपाल कोश्यारी तात्यांनी बंडखोर एकनाथ शिंदेच्या गटातील आमदारांना सुरक्षा देण्याचा आदेश सोडलाय..

लग्नानंतरही या अभिनेत्रीसोबत होते अजय देवगणचे अफेअर, काजोलला कळताच झाले होते असे हाल, वाचा हा किस्सा..

हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top