एशिया कप साठी भारतीय संघाची झाली घोषणा, विराट कोहलीच्या कामगिरीवर असेल सर्वांची नजर, पाहा संघ..
BCCI ने एशिया कप 2022 साठी 15 सदस्यीय भारतीय क्रिकेट संघाची घोषणा आज केली आहे. टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. माजी कर्णधार विराट कोहली संघात परतला आहे. तो अखेरचा इंग्लंडविरुद्ध खेळला होता. स्टार सलामीवीर केएल राहुलनेही फेब्रुवारीनंतर प्रथमच संघात स्थान मिळवले आहे. त्याला आगामी T20 स्पर्धेसाठी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. कोविड-19 च्या संक्रमनामुळे राहुल वेस्ट इंडिजविरुद्धच्या मागील मालिकेत सहभागी होऊ शकला नव्हता. स्पोर्ट्स हर्नियाच्या शस्त्रक्रियेतून बरा झाल्यानंतर तो संघात परतला आहे.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीमुळे आगामी स्पर्धेत निवडीसाठी उपलब्ध नसल्याचेही बीसीसीआयने ट्विट केले आहे. या स्पर्धेसाठी तीन खेळाडूंना बॅकअप म्हणून ठेवण्यात आले आहे. हे खेळाडू आहेत श्रेयस अय्यर, दीपक चहर आणि अक्षर पटेल. आशिया चषक 2022 मध्ये, भारताला 28 ऑगस्ट रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे.
विराट कोहली आणि केएल राहुल यांनी पुनरागमन केले
फॉर्मात नसलेला फलंदाज विराट कोहलीची आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय टी-२० संघात निवड करण्यात आली आहे. 17 जुलै रोजी इंग्लंड दौऱ्यानंतर एका महिन्याहून अधिक कालावधीच्या विश्रांतीनंतर तो पुनरागमन करत आहे. नुकत्याच संपलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेतून त्याला विश्रांती देण्यात आली होती आणि झिम्बाब्वेमधील आगामी एकदिवसीय मालिकेतही तो विश्रांती घेणार आहे.

गेल्या वर्षीच्या विश्वचषकापासून कोहलीने केवळ चार टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि १९ सामने गमावले आहेत. त्या चार सामन्यांमध्ये त्याने 20 च्या सरासरीने आणि 128.57 च्या स्ट्राईक रेटने 81 धावा केल्या आहेत. याशिवाय उपकर्णधार केएल राहुलचेही संघात पुनरागमन झाले आहे, जो स्पोर्ट्स हर्नियाच्या शस्त्रक्रियेमुळे बराच काळ संघाबाहेर होता. या दुखापतीतून सावरल्यानंतर त्याला कोरोना झाला, त्यामुळे तो वेस्ट इंडिजचा दौरा करू शकला नाही.
🚨#TeamIndia squad for Asia Cup 2022 – Rohit Sharma (Capt ), KL Rahul (VC), Virat Kohli, Suryakumar Yadav, Deepak Hooda, R Pant (wk), Dinesh Karthik (wk), Hardik Pandya, R Jadeja, R Ashwin, Y Chahal, R Bishnoi, Bhuvneshwar Kumar, Arshdeep Singh, Avesh Khan.
— BCCI (@BCCI) August 8, 2022
जसप्रीत बुमराह आशिया कपमधून बाहेर पडणे हा भारतासाठी मोठा धक्का आहे. बुमराहच्या अनुपस्थितीत, भारतीय गोलंदाजी युनिट थोडी कमकुवत होणार आहे. मोहम्मद शमीलाही संघात स्थान मिळालेले नाही. दीपक हुडा आणि सूर्यकुमार यादव यांना खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केल्याबद्दल बक्षीस मिळाले आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप आणि फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई यांनाही १५ जणांच्या संघात स्थान देण्यात यश आले आहे. पांढऱ्या चेंडूच्या म्हणून संघात स्थान मिळालंय. निवडकर्त्यांना प्रभावित करण्यात अर्शदीप आणि रवी यशस्वी ठरले आहेत. इशान किशन आणि संजू सॅमसन यांनाही आशिया कप संघातून वगळण्यात आले आहे. संजूने गेल्या काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली होती.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हेही वाचा:
किस्सा 2013 गाडीचा: याचं गाडीमुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब दाऊद गॅंगच्या तावडीतून वाचले होते.
हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..