छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य संग्रामाचे पहिले सेनापती वीर बाजी पासलकर होते..

आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य संग्रामाचे पहिले सेनापती वीर बाजी पासलकर होते..


छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. जगच्या इतिहासात एक तेजस्वी पर्व निर्माण केले. रयतेच्या या राजाने असामान्य साहसाचे, ऊत्कट देशभक्तीचे आणि रयतेच्या कल्याणासाठी कार्यरत राहण्याचे व्रत आंगिकारले.

छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य कार्यात प्रारंभी सहभागी झालेले बाजी पासलकर हे स्वराज्याचे पहिले सेनापती होते.

ह्या पराक्रमी पुरूषाचा ईतिहास प्रेरणादायी असाच आहे.

मोसे खोयातील मोसे बु. गावाचे हे भुमिपुत्र ‘यशवंतराव’ किताबाने कीर्तीवंत झालेले होते. ८४ मोसे खोऱ्यातील  हे वतानदार गोर-गरीबांचे आधार होते. रोहिड खोयात आणि गुंजन मावळात त्यांच्या सज्जनतेची आणि दिलदारपणाची ख्याती होती. बाजी लढताना एक घाव त्यांच्या पाठून त्यांच्या फिरंग समशेरधारी उजव्या हातावर झाला.

वेदनेने कळवळलेले बाजी त्या भ्याडाचा प्रतिकार करण्यासाठी त्याही परिश्तितीत वळले आणि तोच क्षण साधत गनिमाची तलवार त्यांच्या छातीवर उतरली. पासष्ठ वर्षांचा तरणाबांड योध्दा-बाजी पडले !

आपल्या मागे वळण्याची इतिकर्तव्यता झाली हे लक्षात येताच फत्तेखान आपल्या सैन्यासह परत वळून पळून गेला.

कावजी मल्हारला हे समजताच तो तीरासारखा सासवडला धावला.आपल्या धन्याचं जखमी शरीर पाठीवर लादून वाहून नेणारी बाजींची यशवंती घोडी आणि कावजी मल्हार यांच्या दु:खाची जात एकच होती ! पुरंदर येईतो बाजींनी शरीरातली धुगधुगी फक्त आपल्या विजयी राजाला – शिवरायांना पहाण्यासाठी व दोन अखेरचे शब्द बोलण्यासाठी शिल्लक ठेवली होती.सदर पोस्ट आपण आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची या पेजवर वाचत आहात. गडाच्या पायथ्यापासून बाजींची पालखी वर आली आणि वाट चुकलेलं कोकरू आपल्या आईला-गोमातेला बघताच धावत सुटतं तसे राजे पालखीकडे धावले!

पालखी उतरून त्यांनी बाजींचं जखमांनी छिन्नविच्छिन्न झालेलं शरीर तोललं आणि त्यांची मान आपल्या मांडीवर घेत टाहो फोडला, “बाजी,आम्हाला असं पोरकं करुन कुठे चाललात?”

बाजी पासलकर

राजांचे अश्रू बाजींच्या जखमांवर पडले.खारट पाण्याने जखमा चुरचुरल्या पण आपलं बलिदान जणू राजाने अभिषेकाने पावन केलं या जाणिवेनं मरणाच्या दारात असलेल्या बाजींच्या गलमिश्या थरथरल्या! क्षीण पण करारी आवाजात ते बोलले,”आरं मांज्या राजा,तुला भेटलो, औक्षाचं सोनं जालं रं मांज्या ल्येकरा! मला ल्योक न्हाई पर मरताना तुंजी मांडी गावली. त्या फत्याचं मुंडकं आननार व्हतो रं, पर डांव चुकला आन् त्यो पळाला.

थोरल्या रांजास्नी पकडून नेणार्‍या त्या नामर्द बाजी घोरपड्याला नागवनार व्हतो पर त्ये बी र्‍हाईलं ! पर तू नगं चिंता करू!, ह्यो मांजा नातू सर्जेराव बाजी जेधे आन् त्येचा बा कान्होजी जेधे हाईती तुंज्या सांगाती. येक डाव माफी कर राजा, म्होरला जलम घिऊन यीन पुन्यांदा सवराज्यासाटी लडाया!तुज्यासाटी द्याया येकलाच जीव गावला ह्ये वंगाळ बंग! म्या चाललू रांजा, आपलं सवताचं सवराज्य व्हनार, जय काळकाई !…..”

राजांच्या मांडीवर प्राण सोडलेल्या बाजींचे डोळे उघडेच होते, ते शिवबांनी मिटले आणि दाबून ठेवलेल्या हुंदक्यांना वाट करून दिली….

प्राणाची बाजी लावणारे बाजी पासलकर शूर वीर होते. स्वराज्यासाठी ते जगले. गेले. अजरामर झाले.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा:

किस्सा 2013 गाडीचा: याचं गाडीमुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब दाऊद गॅंगच्या तावडीतून वाचले होते.

कोरोनातून बरे होताच राज्यपाल कोश्यारी तात्यांनी बंडखोर एकनाथ शिंदेच्या गटातील आमदारांना सुरक्षा देण्याचा आदेश सोडलाय..

लग्नानंतरही या अभिनेत्रीसोबत होते अजय देवगणचे अफेअर, काजोलला कळताच झाले होते असे हाल, वाचा हा किस्सा..

हा डाकू इंग्रज लोकांना मारून त्यांच्या हाताची बोटे कापून घेऊन जायचा..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top